विक्राम दादा पाचपुते साईकृपा हिरडगाव साखर कारखान्याचे चेअरमन यांनी मोर्चाचे धास्तीने दिले लेखी पत्र पंधरा जून पर्यंत देणार उसाची बिले

विक्राम दादा पाचपुते साईकृपा हिरडगाव साखर कारखान्याचे चेअरमन  यांनी मोर्चाचे धास्तीने दिले लेखी पत्र पंधरा जून पर्यंत देणार उसाची बिले 

करमाळा प्रतिनिधी : बहुजन संघर्ष सेना जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ कदम यांनी साईकृपा साखर कारखान्याने ऊस बिले थकले मुळे 31 मेला  चेअरमन च्या घरावर मोर्चा  काढणार आशी घोषणा केली होती त्याचा परिणाम म्हणून साईकृपा साखर कारखान्याचे चेअरमन यांनी दखल घेऊन बहुजन संघर्ष सेना जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ कदम व शेतकर्‍यांना श्रीगोंदा येथे बैठकीचे निमंत्रण दिले दिनांक 23/5/2023 रोजी चेअरमन यांच्या माऊली बंगल्यावर बैठक झाली सदर बैठक की मध्ये 15 जून पर्यंत ऊस बिले काढणार असल्याचे लेखी पत्र चेअरमन विक्रम दादा पाचपुते यांनी दिले व मोर्चा स्थगित करण्याची चेअरमन यांनी विनंती केली त्या मुळे एकतीस मे चा मोर्चा स्थगित झाल्याची घोषणा राजाभाऊ कदम यांनी केली बैठकीस साईकृपा साखर कारखाना ( हिरडगाव) कारखान्याचे चेअरमन विक्रम दादा पाचपुते, कारखान्याचे कार्यकारी संचालक, शेतकी अधिकारी, नंदकिशोर वलटे,कुंडलिक चोरमले, संदीप मरकड, चन्द्र शेखर पाटील, नारायण पडवळे, आदी शेतकरी उपस्थित होते

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश