दिल्लीत भाजपचे सरकार,करमाळा भाजपाकडून जोरदार जल्लोष

दिल्लीत भाजपचे सरकार,करमाळा भाजपाकडून जोरदार जल्लोष 



करमाळा:- प्रतिनिधी  हर्षवर्धन गाडे

भारतीय जनता पार्टीचे सरकार दिल्ली येथे बहुमतामध्ये स्थापन होताच करमाळा भाजपाकडून जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या नेतृत्वामध्ये कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला. गायकवाड चौक करमाळा येथील भाजपा संपर्क कार्यालयासमोर भारत माता की जय,भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा देऊन परिसर दुमदुमून काढला व फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी केली.यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे म्हणाले की आता दिल्लीत भाजपचे सरकार एकहाती बहुमतातने आले आहे.केंद्रातही भाजपाचे सरकार आहे. सामान्य जनतेने केंद्र सरकारच्या कारभारवर, विकासकामावर व एकूणच ध्येयधोरणावर विश्वास टाकल्याने दिल्लीमध्ये भाजपचे सरकार आले.दिल्ली ही देशाची राजधानी असल्याने तिथे भाजपची सत्ता येणे गरजेचे होते.दिल्लीत सरकार आल्यामुळे तेथील जनतेला आता याचा मोठा लाभ होणार असून जागतिक पातळीवर दिल्लीचे महत्व  माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली भविष्यात वाढणार आहे.भाजपच्या या विकासाला चालना देणाऱ्या व देश विकासाच्या गतीने पुढे नेणाऱ्या धोरणला दिल्लीतील मतदारांनी  बहुमत देऊन पाठिंबा दिला आहे. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव,तालुकाध्यक्ष राम ढाणे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, 
सरचिटणीस काका सरडे, नितीन झिंजाडे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल पवार, उद्योग आघाडीचे तालुका अध्यक्ष आजिनाथ सुरवसे, किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष सोमनाथ घाडगे,सरचिटणीस गणेश वाळुंजकर, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश ननवरे, शहर उपाध्यक्ष राजू सय्यद,नानासाहेब अनारसे,डॉ. किरण शिंदे, कमलेश दळवी, राजेश पाटील, नानासाहेब अनारसे, गौतम दळवी,राजेश पाटील, गणेश वाळुंजकर, सुनील नेटके, 
विनोद इंदलकर,महादेव गोसावी,गणेश गोसावी आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

उमरड येथील ओढ्यावर पूल बांधण्यासाठी माजी आमदार नारायण पाटील यांनी सिमेंटच्या नळ्या उमरड येथील ओढ्यावर पोहोच केल्या ग्रामस्थांमध्ये आनंद

कुगाव बोट दुर्घटना ....प्रशासनाशी समन्वय ठेवून आहे...आमदार संजयमामा शिंदे यांची माहिती

करमाळा तालुक्यातील आ.संजयमामा शिंदे यांच्या गाव भेट दौऱ्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...