करमाळा तहसील कार्यालयासमोर रयत क्रांती संघटना धरणे आंदोलन
करमाळा तहसील कार्यालयासमोर रयत क्रांती संघटना धरणे आंदोलन ,
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी
राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी
एक दिवसीय लाक्षणिक
आंदोलन शेतकऱ्यांचे संपूर्ण पिक कर्ज माफ झाले पाहिजे.शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी दिवसा बारा तास विद्युत पुरवठा करा.जिह्यातील ऊस उत्पादक शेतकर्याचे थकीत ऊस बिल १५ टक्के व्याजासहित जमा करा.सोयाबिन ला प्रती क्विंटल ६००० रूपये व कांद्याला प्रती क्विंटल ४००० रूपये भाव द्या.
करमाळा तहसील कार्यालय येथे एक दिवसीय धरणे लाक्षणिक आंदोलन करण्यात आले, यावेळी सरकारकडे विविध मागण्या मांडण्यात आल्या यावेळी अजय बागल राज्य कार्यकारणी सदस्य ,सोनाबाई किसन चांदणे,शिवशंकर जगदाळे तालुकाध्यक्ष,महावीर नरसाळे संस्थापकीय सदस्य सिकंदर मुलानी,संतोष वारगड जिल्हाप्रमुख नवनाथ सुरवसे,माउली क्षीरसागर,अमोल बागल,प्रताप क्षीरसागर, सुभाष बागल,निळकंठ राऊत,पुरुषोत्तम नरसाळे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते